भाग १: शेअर बाजार मूलभूत माहिती हा शेअर बाजार नेमका काय आहे? याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात! असं नाहीये की कोणीतरी बसल्या-बसल्या केवळ मनोरंजन किंवा व्यवसाय म्हणून शेअर बाजार सुरू केला. तर शेअर बाजार हा गरज म्हणून समोर आलेला पर्याय आहे. तो आजच्या काळाचा आहे का? तर नाही! तो अनेक शतकांपासून सुरू आहे. फक्त त्याचे…
Category: अनुभव
विश्व म्हणजे…
कधी कधी वाटतं हे विश्व म्हणजे ईश्वराने अर्ध्यावरती सोडलेला डाव आहे. एका वळणावर असताना या विश्वाला सोडून तो निघून गेला आणि हा अर्धवट राहिलेला डाव उधड्यावर पडला. त्याची वाट पाहून सोंगट्याही थकतात मग आणि त्यातीलच एक सोंगटी स्वतःच हलू लागते. ती स्वतःच्या बोलण्याने, बुद्धीने डाव सुरू करते. एका वळणावर त्या सोंगटीलाही जाण होते की हे…
डायरी…
सोशल मीडिया पेक्षा डायरी लिहिणं फार फायद्याचं आहे असं वाटतंय. कारण आपली डायरी ही फक्त आपण वाचत असतो, त्यातून अंतर्मुख होण्याची संधी मिळत असते. दुसऱ्यांच्या वाटण्या, न वाटण्याचा तिथे संबंध येत नाही. मनातील प्रत्येक खदखद व्यक्त करता येते. भूतकाळाचा पट समोर असतो ज्यातून कदाचित भविष्यातील कोडी सुटू शकतात. सोशल मीडिया मात्र नेमका याउलट असतो! इथे…
कोरोंनादरम्यान…
भारत जगातील असा एकमेव देश आहे जिथे सरसकट 130 कोटी जनतेला एकाच वेळेस Lockdown मध्ये जावं लागलं होतं. जगभरात कोरोना वायरसने उच्छाद मांडला होता तेंव्हा भारत त्यापासून अलिप्त होता. पण या राक्षसाची भारतावरही वक्रदृष्टी पडली आणि बघता बघता देश बंद करावा लागला. दररोज नवनवीन बातम्या येऊ धडकत होत्या. शिवाय माणसाला अशा परिस्थितीचं गांभीर्य लवकर समजत…
Lockdown & Latur
आयुष्यात असे काही क्षण असतात जे कायम स्मरणात राहतात. त्या क्षणांचे मोल करता येत नाही. मनाच्या कोपर्यात ते कायमच वेगळी जागा राखून असतात आणि त्या क्षणांचे एक चित्र मेंदूत कायमचे कोरले जाते. सध्या जग एका वेगळ्याच संकटातून जात आहे. ते आहे Lockdown! कोरोंना नामक एका विषाणूने इतका उच्छाद मांडला आहे की त्याच्या भयाने सर्व…
उत्तरायण
कुरुक्षेत्रावर शस्त्र उचलणार नाही असं वचन देऊन बसलो मी पार्थ… ती माझी चूकच नव्हती का? की तुमच्या सामर्थ्यावर ठेवलेला अतिरेकी विश्वास होता? मी वेळीच शस्त्र उचललं असतं तर अनेकांचे प्राण वाचले असते, विनाश टळला असता… जेंव्हा गुरू भीष्म अजेय वाटू लागले तेंव्हा तुमच्यावरील विश्वास ढळला आणि हतबल होऊन शेवटचा पर्याय म्हणून मी रथचक्र हाती घेऊन…
व्यवस्था आणि चेहरे!
कोंबडी आधी की अंडा हा प्रश्न जसा अनुत्तरित आहे तसाच अजून एक प्रश्न आहे जो सदासर्वकाळ अनुत्तरित असला तरी सामान्यतः सामान्यांना पडत नाही. तो प्रश्न म्हणजे व्यवस्था आपल्याला भ्रष्ट करते की आपण व्यवस्थेला? पण हा प्रश्न अधून मधून डोकं वर काढत असतो. आता निमित्त आहे ते #YesBank आणि त्याचे माजी सर्वेसर्वा राणा कपूर यांच्या अटकेने….
“Is this the End?”
एक चित्रपट बघितला होता “The Day The Earth Stood Still”। चित्रपटात, एके दिवशी अचानक एक UFO पृथ्वीवर येतो। त्यातून आलेला एक परग्रहवासी म्हणजेच एक Alien मानवाच्या हाती लागतो। सुरुवातीला असं वाटतं की ते Alien पृथ्वीवर हल्ला करण्यासाठी आले आहेत। पण ते वाचवण्यासाठी आलेले असतात। मानवाला नाही तर मानवपासून पृथ्वीला! मानवाच्या बेजबाबदार वागण्याने “सजीवसृष्टीसाठी अनुकूल” असलेल्या…
अश्रूंची शाळा
चंद्रयान2 || ISRO || विक्रम कालची रात्र भारतीयांसाठी दुर्दैवी ठरली. अवघ्या 2 किमी अंतरावर येऊन चांद्रयान2 मोहीम अपयशी ठरली. हा क्षण याची देही याची डोळा अनुभवत असणार्या प्रत्येक भारतीयाने हळहळ व्यक्त केली. भारत विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडतो अगदी तसा क्षण होता हा. भारतीय म्हणून एकत्र असण्याचे अगदी काही मोजक्या क्षणांपैकी हे क्षण असतात. मोहीम अपयशी…